नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! आजच्या या खास ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील “बालसाहित्यिक गिरिजा कीर – स्थूलवाचन” या धड्याचा स्वाध्याय घेऊन आलो आहोत.
हे प्रश्न-उत्तर तुमच्या अभ्यासाला अधिक सुलभ आणि समजण्यासारखे बनवण्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत.
जर तुम्हाला इतर कोणत्याही धड्याचे प्रश्न-उत्तर हवे असतील, तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही लवकरच तेही तुमच्यासाठी घेऊन येऊ.
चला तर मग, सुरुवात करूया – बालसाहित्यिक गिरिजा कीर: स्थूलवाचन – स्वाध्याय, इयत्ता 10वी मराठी.
बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन) कृती | Balsahityika Girija Kir Sthoolvachan Solutions
बालसाहित्यिका गिरिजा कीर स्वाध्याय
प्रश्न १ ] आकृत्या पूर्ण करा.

उत्तर :-
अ) कथा
- माणुसकीचे दर्शन घडते.
- कथा वाचकांना खिळवून ठेवतात.
- वास्तववादी चित्रणावर भर
आ) चरित्रे
- प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार मांडलेला आहे.
- मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा .
- सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी.
प्रश्न २ ] टिपा लिहा.
(अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.
उत्तर :-
गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
(आ) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
उत्तर :-
कोणाला दुःखी ठेवू नये’ असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तरी दुःखी का ठेवावे, असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो.
लोक संस्कृत विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे, असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात-धर्म यांचा विचार करू नये, असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो.
प्रश्न ३ ] ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
उत्तर :-
आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे.
आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.
प्रश्न ४ ] साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा
उत्तर :-
आपण एखादया कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:
कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे.
आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो.
पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.
Class 10th Marathi Textbook Solution
- 1. जय जय हे भारत देशा (गीत) कृती ( मराठी कुमारभारती )
- 2 बोलतो मराठी कृती – ( मराठी कुमारभारती )
- 3 आजी : कुटुंबाचं आगळ कृती – ( मराठी कुमारभारती )
- 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) कृती – ( मराठी कुमारभारती )
- 5 वसंतहृदय चैत्र कृती – ( मराठी कुमारभारती )
- बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन) कृती – ( मराठी कुमारभारती )